लाडक्या बहिणींचा नाद खुळा! आता नुसते पैसे नाही, तर सरकार देणार बिनव्याजी कर्ज; फडणवीसांची ‘कडक’ घोषणा!
लाडक्या बहिणींचा नाद खुळा! आता नुसते पैसे नाही, तर सरकार देणार बिनव्याजी कर्ज; फडणवीसांची 'कडक' घोषणा!

मुबई : बायांनो, आता नुसते महिन्याचे पैसे घेऊन गप बसायचं नाही! महिलांना स्वतःच्या पायावर खंबीर उभं करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकदम भारी आणि कडक प्लॅन आणलाय. भाईंदरच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत झालेल्या ‘विकसित भारत नारी शक्ती संगम’ या कार्यक्रमात त्यांनी या मोठ्या निर्णयाचा धुरळा उडवला.
काय आहे साहेबांची नवी घोषणा?
नुसते पैसे नाही, आता धंद्याला बळ: आपली ‘लाडकी बहीण’ योजना आता नुसती पैशांपुरती मर्यादित राहणार नाही, तर ती बाकीच्या सरकारी योजनांना जोडली जाणार आहे.
बिनव्याजी कर्जाचा जुगाड: आता मायमाऊल्यांना स्वतःचा धंदा-पाणी चालू करायला मुंबई बँकेकडून एकदम बिनव्याजी आणि विनातारण (म्हणजे कसलीच गॅरंटी किंवा जामीन न देता) कर्ज मिळणार!

हप्ता कसा भरणार? एकदम सोप्पं!: आता तुम्ही म्हणाल कर्जाचा हप्ता कसा भरायचा? तर त्याचंही टेन्शन नाही. लाडकी बहीण योजनेतून जे हक्काचे पैसे सरकारकडून मिळतात ना, त्यातूनच या कर्जाची फेड होणार. म्हणजे खिशाला कात्री नाही!
माल विकायचा कुठं? ‘उमेद मॉल’मध्ये!
माल तर बनवू, पण विकायचा कुठं? तर त्यासाठी सरकार ‘उमेद’ अभियानातून प्रत्येक जिल्ह्यात ‘उमेद मॉल’ थाटणार आहे. तिथं आपल्या बायांनी बनवलेला अस्सल माल विकला जाणार. मोठ्या मोठ्या प्रायव्हेट कंपन्यांना आपल्या पोरीबाळी आता थेट टफ फाईट (कडक टक्कर) देणार, असा रांगडा विश्वास मुख्यमंत्र्यांनी ठोकून सांगितलाय.
बायकांची इमानदारी आणि साहेबांचं कौतुक:
फडणवीसांनी कार्यक्रमात बायकांचं लय भारी कौतुक केलं बरं का! ते म्हणले, “बाकीच्यांना कर्ज दिलं तर निम्मी लोकं पैसे बुडवतात (फक्त ५०% परतफेड), पण आपल्या महिला बचत गटांना किंवा बायांना कर्ज दिलं की ९९ टक्क्यांच्या वर पैसे वेळेवर आणि इमानदारीने परत येतात!” महिलांचा हाच प्रामाणिकपणा आणि जिद्द बघून सरकारने त्यांच्यावर हा मोठा विश्वास टाकलाय.
थोडक्यात काय, तर आता चुलीपुढं बसून राहायची वेळ गेली, आता लाडक्या बहिणी थेट उद्योजक आणि ‘मालकीणबाई’ होणार!





