Uncategorized

नाशिक जिल्हा हादरला ! पिकअप – लक्झरी बसच्या भीषण अपघातात 3 शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू

नाशिक जिल्हा हादरला ! पिकअप - लक्झरी बसच्या भीषण अपघातात 3 शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू

नाशिक : नाशिक जिल्हा पुन्हा भीषण अपघाताने हादरला आहे. (Nashik) अपघाताची तीव्रता भीषण असल्याने 3 शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले आहे.

कळवणहून नाशिकच्या दिशेने भाजीपाला विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या पिकअप आणि लक्झरी बसचा समोरासमोर धडक (Pickup and luxury bus accident) होऊन झालेल्या भीषण अपघातात पिकअपमधील 3 शेतकरी जागीच ठार (3 farmers Death) झाले. तर चार ते पाच शेतकरी जखमी झाले आहेत.

Whatsapp Group Join
Telegram channel Join

नाशिक-सापुतारा महामार्गावरील (Nashik-Saputara Highway) बोरगावच्या चिखली शिवार वळणावर हा भीषण अपघातात झाला. अपघातानंतर संतप्त शेतकऱ्यांनी लक्झरीच्या काचा फोडून तोडफोड केली आहे. अपघातानंतर घटनस्थळी मोठा जमाव जमल्याने तणाव निर्माण झाला होता.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघातग्रस्त शेतकरी कळवण तालुक्यातील राहिवाशी असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Whatsapp Group Join
Telegram channel Join

सविस्तर वृत्त असे…

नाशिक जिल्ह्यातील कळवण येथील शेतकरी कळवणहून नाशिकला भाजीपाला विक्रीसाठी घेऊन जात होते. त्यावेळी नाशिक-सापुतारा रोडवर नाशिकच्या दिशेने वळत असताना अचानक जाणाऱ्या पिकअप- लक्झरी बसचा सामोरासमोर धडक होऊन भीषण अपघातात झाला. यावेळी पिकअपमधील 3 शेतकरी जागीच ठार झाले तर चार ते पाच शेतकरी जखमी झाले आहेत.

लक्झरी बसच्या काचा फोडून प्रचंड नुकसान

या अपघातात 3 शेतकरी जागीच ठार झाल्याने जमाव संतप्त झाला होता. अपघातात तीन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी लक्झरी बसच्या काचा फोडून प्रचंड नुकसान करण्यात आले आहे. याप्रकरणी लक्झरी बसच्या चालकावर गुन्हा दाखल करुन त्यांना कडक शिक्षा देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

माल रस्त्यावर विस्कटला

पिकअपमध्ये शेतातील माल भरला होता, त्यामुळे पिकअप आणि लक्झरी बसची समोरासमोर धडक झाली त्यावेळी पिकअपमधील शेतकऱ्यांचा माल रस्त्यावर विस्कटलेला होता. यावेळी पिकअप वाहनाचेही नुकसान झाले आहे.

पिकअप क्रमांक – MH 41 AU 2192

अपघातग्रस्त शेतकरी कळवण तालुक्यातील राहिवाशी आहेत.

लक्झरीच्या काचा फोडून तोडफोड

नाशिक-सापुतारा महामार्गावरील बोरगावच्या चिखली शिवारात वळणावर हा भीषण अपघातात झाला असून अपघातानंतर संतप्त शेतकऱयांनी लक्झरीच्या काचा फोडून तोडफोड केली.अपघातस्थळी मोठा जमाव जमल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

Whatsapp Group Join
Telegram channel Join

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button