पाऊस नाही पीक जळतंय पिक विमा क्लेम करावा का ? या शेतकऱ्यांना नाही मिळणार पिक विम्याचे पैसे
पाऊस नाही पीक जळतंय पिक विमा claim करावा का ? या शेतकऱ्यांना नाही मिळणार पिक विम्याचे पैसे

मुंबई : शेतकरी मित्रांनो खरीप पीक विमा 2023 संदर्भात एक महत्वाचा असा update आहे. आणि सर्व शेतकरी बांधवांसाठी ज्या शेतकऱ्यांनी 2023 पीकविमा भरलेला आहे. त्या शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण विषय होणार आहे. ज्या शेतकरी बांधवांना 2023 चा जर पीक विमा मिळवायचा असेल तर हि माहिती शेवट पर्यंत वाचा..
शेतकरी बांधवांनो खरीप 2023 पीक विमा राज्यातील जवळपास 1 कोटी 70 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी भरला. यावेळी हा पीक विमा 1 रुपयामध्ये राबवण्याकरिता शासनाकडून मंजुरी देण्यात आलेली होती आणि त्यामुळे 1 रुपयामध्ये बहुतांश शेतकऱ्यांनी पीक विमा भरला.
जवळपास राज्यातील 1 कोटी 70 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरला. परंतु मित्रांनो तुम्हाला जर दोन हजार तेवीसचा पीक विमा मिळवायचा असलं तर तुम्हाला तीन कामं महत्वाचे करावी लागेल. पहिलं काम म्हणजे तुम्हाला E पीक पाहनी करावी लागेल. तुम्ही जर तुमची ही पीक पाहणी जर केली नाही, तुमच्या सातबार्यावर जर तुम्ही जे पिक लावलेले असेल व त्याच पिकांचा पिकविमा उतरवलेला असेल त्यांनाच पिकविम्याचा फायदा होणार आहे.
पिकविम्यासाठी पिकांची नोंद तुमच्या सातबार्यावर होणे आवश्यक आहे. आणि तुम्हाला तुमच्या सातबार्यावर जर नोंद करायची असल, तर तुम्ही लवकरात लवकर ई- पीक ( E Pik pahani ) पाहणी करून घेणे अत्यंत महत्वाचं आहे.आणि ते अगदी सोपं आहे तसेच आता तुम्हाला पीक पाहणी करण्याकरिता तलाठ्याकडे जाण्याची गरज नाही

तुम्ही तुमच्या स्वतःच्या स्मार्ट फोन वरून आणि या E Pik pahani appच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या स्वतःची ही पीक पाहणी करू शकता आणि ही पीक पाहणी जर केली नाही तर तुम्हाला खरीप 2023 चा पीक विमाचा एक रुपयासुद्धा मिळणार नाही तुम्ही जर पीक विमा claim जरी केलेलं असलं तरी तुम्हाला पीक पाहणी केल्याशिवाय पीक विमा मिळणार नाही तुमच्या सातबार्यावर तुम्ही ज्या काही पीक विम्याला त्याच पिकाची नोंद असणे आवश्यक आहे त्यामुळे जो पीक पीक विमा ज्या पिकाचा भरलेला आहे.
दुसरी अट महत्वाची म्हणजे claim ( नुकसान भरपाईचा अर्ज दाखल करण्याची ) करणे, याच्या अगोदर मागील दोन तीन वर्षाचा विचार केला तर 72 तासात म्हणजे पीक नुकसानीच्या 72 तासाच्या आत शेतकर्यांनी claim करणे अत्यंत महत्वाचे होते. परंतु ती आता अट वाढवलेली आहे. तुम्ही 96 तासाच्या आत तुमचं जर पिकाचं नुकसान अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे जर नुकसान झालं. तर तुम्ही 96 तासाच्या आत claim करू शकता जर तुमची 96 तासाच्या आत claim जर केलेला नाही तर तुम्हाला सुद्धा 2023 चा पीक विमा मिळणार नाही.
पाऊस नाही पीक जळतंय पिक विमा claim करावा का ?
आता बहुतांश शेतकरी आम्हाला प्रश्न विचारतात की, आता आम्ही पिकनुकसान अर्ज करु का ? सद्या पाऊस पडत नाही, पाऊस नाही पिकं जळताय,पिकाचा चारा झाला,या परीस्थितीत आता जर claim केला तर पीक विमा येईल का?… हो येईल पण पण खूप कमी येईल ज्यावेळेस तुमचं पीक शेंगाच्या फुलाच्या अवस्थेत असतं किंवा पीक हातात यायच्या अवस्थेत असतं त्यावेळेस जर तुमचं जर नुकसान झालं किंवा पूर परिस्थिती अतिवृष्टीमुळे जर तुमचं त्यावेळेस जर नुकसान झालं तर त्यावेळेस तुम्हाला भरपूर पीक विमा मिळू शकतो हेक्टरी वीस हजार ते हेक्टरी तीस हजार रुपयापर्यंत तुम्हाला पीक विमा मिळू शकतो परंतु सध्या जर तुम्ही जर claim केला तर तुम्हाला हजार, दोन हजार किंवा तीन हजारच रुपये पीक विमा मिळेल. त्यामुळे आता हि वेळ claim करण्याइतके योग्य समजू नका आणि claim सुद्धा करू नका claim जर केला तर तुमच्या स्वतःच नुकसान होईल त्यामुळे ज्यावेळेस तुमचं पीक काढायला येतं किंवा काढायच्या वेळेस जर तुमचं जर नुकसान जर झालं अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे जर पीक गेलं तर जास्त प्रमाणात विमा मिळतो.मात्र तुमचं पिक जळून जात असेल तर तुम्ही पिक विमा claim करु शकता.
आपल्या मोबाईल मध्ये पिक विमा claim केल्म कसा करावा यासाठी माहिती अवश्यक असल्यास आमच्या व्हाॅट्स अॅप गृपला जाईन व्हा…मॅसेज करा…





